Ad will apear here
Next
डॉ. आंबेडकरांनी पडघा येथेही केला होता पाणी सत्याग्रह
महापरिनिर्वाण दिनानिमित्त पडघ्यातील नागरिकांनी दिला डॉ. आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा


भिवंडी :
ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती आणि तेथे पाणी सत्याग्रहही केला होता. त्या आठवणीला पडघ्यातील नागरिकांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त उजाळा दिला. डॉ. बाबासाहेबांनी केलेला चवदार तळ्याचा सत्याग्रह सर्वांना माहिती आहे; मात्र पडघ्यातील या सत्याग्रहाबद्दल तितकी माहिती सर्वांना असतेच असे नाही. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पडघा येथे पाणी सत्याग्रह आयोजित केला होता. त्यासाठी डॉ. आंबेडकर काशिनाथ दोंदे यांच्याकडे उतरले होते. पडघ्यातील सुप्रसिद्ध सडकेवरची विहीर सत्याग्रहासाठी निवडण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या सत्याग्रहींनी विहिरीचे पाणी काढले होते. या घटनेचा संदर्भ ठाणे संघसरिता या पुस्तकामध्ये आहे. 

पडघा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली होती, असे समतानगर येथील नागरिकांचे म्हणणे आहे. ‘आम्ही लहान होतो, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पडघ्यात आले होते. तेव्हा पडघा परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त होते. पडघा येथे त्यांची सभा झाली होती,’ अशी आठवण हिराबाई सोनावणे (वय ८२) यांनी सांगितली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३वा महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर २०१९ रोजी आहे. त्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZXJCH
Similar Posts
समतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा बोरीवली : १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या दिवसाचे औचित्य साधून ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील समतानगर, बोरिवली पडघा येथील समाज विकास मंडळ व समतानगर येथील ग्रामस्थांच्या वतीने ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन बुद्धविहाराच्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
बोरिवलीच्या समतानगरमधील जिल्हा परिषद मराठी शाळेत वाचन प्रेरणा दिन भिवंडी : भिवंडी तालुक्याच्या पडघा केंद्रातील समतानगर, बोरिवली येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत १५ ऑक्टोबर २०१९ रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
भिवंडीत फटाकेमुक्त दिवाळी अभियानाला सुरुवात भिवंडी : फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे भिवंडीतील शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा प्रधान सचिव गणेश शेलार यांनी भिवंडीतील रांजणोली, शिवनगर, चौधरपाडा, सावाद, मुठवल, सरवली या जिल्हा परिषद
बुद्ध धम्मामुळे परिवर्तन व जीवनाचे सोने झाले : प्रा. शुक्राचार्य गायकवाड भिवंडी : ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील गोरसई येथे ६३वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड, सणसवाडी (पुणे) येथील बुद्धिस्ट मूव्हमेंट सेंटरचे सुनील भवार, एस. बी. गायकवाड, बँक व्यवस्थापक शिवनाथ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language